मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

माल्दा दंगलीवरील नकवींचे चिंतन

कमर नकवी हे मुस्लीम समाजातील प्रगतीशील विचाराचे लेखक, पत्रकार मानले जातात. 'आजतक' वृत्तवाहिनीचे ते ८ वर्षे न्यूज डायरेक्टर होते. नवभारत टाईम्समध्येही ते कायर्रत होते. 35 वर्षांपासून ते पत्रकारितेत आहे व सध्या 'राग देश' नावाचा वेब ब्लॉक लिहितात. नकवी हे हिंदुत्ववादी विचारांच्या जवळचे नाहीत, हे अगोदरच स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. माल्दा येथील दंगलीनंतर त्यांनी 'राग देश'वर एक लेख लिहिला. त्याचा मथळा आहे - 'माल्दा, मुसलमान और कुछ सवाल'. नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे

     सध्या पश्‍चिम बंगालमधील माल्दा येथे झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा सोशल मीडियावर गाजतो आहे. डिसेंबरच्या प्रारंभी एका कट्टर हिंदुत्ववाद्याने लखनौ येथे काढलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावर महिनाभरानंतर थेट माल्दा येथे प्रतिक्रिया उमटली. संतप्त मुस्लीम आंदोलकांनी जाळपोळ केली, सरकारी संपत्तीचे नुकसान केले.... एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊनही कुण्याही सेक्युलर विचारवंताला त्याचा निषेध व्यक्त करावा वाटला नाही... पुरस्कार परत करावा वाटला नाही. या ढोंगीपणावर सोशल मीडियात बरंच लिहिल्या जात आहे. पण मला विशेषत्वाने दखल घ्यावी वाटते ती ज्येष्ठ पत्रकार कमर वहीद नकवी यांच्या लेखाची.

     कमर नकवी हे मुस्लीम समाजातील प्रगतीशील विचाराचे लेखक, पत्रकार मानले जातात. 'आजतक' वृत्तवाहिनीचे ते ८ वर्षे न्यूज डायरेक्टर होते. नवभारत टाईम्समध्येही ते कायर्रत होते. 35 वर्षांपासून ते पत्रकारितेत आहे व सध्या 'राग देश' नावाचा वेब ब्लॉक लिहितात. नकवी हे हिंदुत्ववादी विचारांच्या जवळचे नाहीत, हे अगोदरच स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. माल्दा येथील दंगलीनंतर त्यांनी 'राग देश'वर एक लेख लिहिला. त्याचा मथळा आहे - 'माल्दा, मुसलमान और कुछ सवाल'. नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे

     नकवी यांच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे येण्यापूर्वी लेखातील दोन मुद्द्यांना स्पर्श करणे आवश्‍यक वाटते. मुस्लीम समाजाच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मुसलमानांचे नेते, उलेमा, मौलवी कधीही लढा देत नाही... पुढे येत नाही, अशी खंत नकवी यांनी या लेखात व्यक्त केली. ती खरीही आहे. पण ही खंत व्यक्त करताना नकवी यांनी तिस्ता सेटलवाडने मात्र असा लढा दिला, असे नमूद केले. तिस्ताने मुसलमानांचे काय भले केले व तिच्या 'सहानुभूती संकलना'तून नेमके कुणाचे भले झाले, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे नकवी यांनी तिस्ताला हे फक्त एका ओळीचे प्रमाणपत्र कशाच्या आधारावर दिले, हे कळत नाही.

     दुसरा मुद्दा आहे, मदरशात राष्ट्रगीत शिकवणार्या मौलानाला मारहाण झाल्याच्या घटनेचा. मीडियाने ही घटना नुकतीच समोर आणली. ही घटना आता घडली नाही, आठ महिन्यांपूर्वीची आहे, ही मारहाण राष्ट्रगीतासाठी झाली नाही, उलट राष्ट्रगीत या मदरशाच्या डायरीत छापले आहे, असे नकवी यांनी या मदरशांमधल्या हिंदू शिक्षकांची साक्ष देऊन नमूद केले आहे. तसे असेल तर बाजारू मीडियाने अशी तद्दन खोटी बातमी देऊन सामाजिक सौहार्द्रतेला नख लावले, असेच म्हणावे लागेल. पण नकवी यांनी हे सांगताना एक बाब मान्य केली आणि ती म्हणजे आठ महिन्यांपूर्वी या मौलानाला मारहाण झाली याचे कारण होते, त्याचे प्रगतीशील असणे व त्याची कट्टरवाद्यांविरोधात असलेली भूमिका. नकवी यांच्या लेखाचाही खरा विषय हाच आहे. मुस्लीम समाजाला प्रगतीशील विचार पटत का नाही

     माल्दा येथील हिंसाचार हिंदू महासभेचा एक नेता कमलेश तिवारी याने लखनौत पैगंबर साहेबांबाबत काढलेल्या अनुद्गारांमुळे घडला. तिवारीच्या बेताल बरळण्याचे कोणालाही समर्थन करता य़ेणार नाही. हिंदी महासभेनेही या बरळण्याचा निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने तिवारीला लगेच गजाआडही केले. मग महिनाभरानंतर त्यावर शेकडो किलोमीटर दूर माल्द्यात प्रतिक्रिया उमटण्यामागचे नेमके कारण काय...? नकवी यांनी हाच प्रश्‍न नेमका विचारला आहे. नकवींनी आणखी काही प्रश्‍न उपस्थित केले आहे. केरळमध्ये एका मुस्लीम व्हिडिओग्राफरने सल्ला दिला की मुस्लीम महिलांनी बुरख्याचा वापर करू नये. त्याचा स्टुडिओ जाळण्यात आला. त्याच राज्यात एका पत्रकार मुस्लीम महिलेने मदरशांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आणले. तिला घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या. त्या सल्ल्यात वा गैरप्रकार उघडकीस आणण्यात कोणती ईशनिंदा होती? त्यात काय ईस्लामविरोधी होते? पण तरीही आपण साधा सल्ला सहन करू शकत नाही... याचा अर्थ इस्लाम म्हणजे असहिष्णु, असा मानावा काय? मुस्लीम समाज काळानुरूप का बदलत नाही? असा सवालच नकवी यांनी उपस्थित केला आहे.

     नकवी यांनी Religious Fundamentalism and Indian Muslims या मथळ्याखाली लिहिलेला मजकूर त्यांच्याच शब्दात वाचणे जास्त श्रेयस्कर आहे. ते म्हणतात -
लेकिन इस हलके से बदलाव के बावजूद भारतीय मुसलिम समाज (Indian Muslim Society) का बहुत बड़ा हिस्सा अब भी कूढ़मग़ज़ है और सुधारवादी कोशिशों में उसका कोई विश्वास नहीं है. वरना ऐसा क्यों होता कि बलात्कार की शिकार इमराना (Imrana Rape Case) और दो पतियों के भँवर के बीच फँसी गुड़िया (The queer case of Gudia, Taufiq and Arif) के मामले में शरीअत के नाम पर इक्कीसवीं सदी में ऐसे शर्मनाक फ़ैसले होते और देश के मुसलमान चुप बैठे देखते रहते! ऐसे मामलों में मुसलमानों का नेतृत्व कौन करता है, उन्हें राह कौन दिखाता है? ले दे कर मुल्ला-मौलवी या उनका शीर्ष संगठन मुसलिम पर्सनल लॉ बोर्ड. राजनीतिक नेतृत्व कभी रहा नहीं. और शहाबुद्दीन, बनातवाला, सुलेमान सैत या ओवैसी सरीखों का जो नेतृत्व यहाँ-वहाँ उभरा भी, धार्मिक पहचान के आधार पर ही उभरा. इसलिए वह मुसलमानों की धार्मिक भावनाओं को ही भड़का कर उन्हें हाँकते रहे. रही-सही कसर तथाकथित सेकुलर राजनीति ने पूरी कर दी, जो वोटों की गणित में कट्टरपंथी और पुरातनपंथी कठमुल्ला तत्वों को पालते-पोसते, बढ़ाते रहे और जानते-बूझते हुए उनके अनुदार आग्रहों के आगे दंडवत होते रहे. इसने मुसलमानों के बीच शुरू हुई सारी सुधारवादी कोशिशों का गला घोंट दिया क्योंकि सत्ता हमेशा उनके हाथ मज़बूत करती रही, जो 'इसलाम ख़तरे में है' का नारा लगा-लगा कर मुसलमानों को भी और सत्ता को भी डराते रहे.”

     नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजातील मुलभूत समस्येला हात घातला आहे. मुस्लीम समाजाची नवी पिढी बदलते आहे. १९८५मध्ये शहाबानोप्रकरणी नकवी यांनी कट्टरवाद आणि मुस्लीम पर्सनल लॉ याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी बोटावर एकट-दुकट मुसलमानांनीच नकवी यांना पाठिंबा दिला होता. पण आता आधुनिक विचारांचे मुसलमान सोशल मीडियावर खुल्या मनाने विचार मांडायला कचरत नाही. मुसलमान समाजाने काळानुरूप बदलण्याची, कट्टरवादाच्या जोखडातून बाहेर पडण्याची, भावनात्मक मुद्द्यांच्या बाहेर येऊन शिक्षण, विकास व विकासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्‍यकता या समाजातले नवविचाराची पिढी सोशल मीडियावर प्रतिपादित करीत आहे आणि हा बदल नकवी यांनाही मान्य आहे. पण त्याचा वेग मंद आहे, हे नाकारता येत नाही.

     लेखाच्या शेवटी नकवी यांनी मुस्लीम समाजाने कशाचा विचार करण्याची गरज आहे, हेही स्पष्ट केले आहे. तेही त्यांच्याच शब्दात वाचणे आवश्‍यक वाटते. ते म्हणतात -

जब तक मुसलमान इस सच्चाई को नहीं समझेंगे और अपनी धार्मिक पहचान से हट कर चीज़ों को देखना और समझना नहीं शुरू करेंगे, तब तक उनकी कूढ़मग़ज़ी का कोई इलाज नहीं है. तब तक उन्हें एहसास भी नहीं होगा कि वह आख़िर अपने पिछड़ेपन और ऐसी जकड़ी सोच से क्यों नहीं उबरते? मुसलमानों को सोचना चाहिए और शिद्दत से सोचना चाहिए कि सुधारवादी और प्रगतिशील क़दमों का हमेशा उनके यहाँ विरोध क्यों होता है? तीन तलाक़ जैसी बुराई को आज तक क्यों ख़त्म नहीं किया जा सका? वे शिक्षा में इतने पिछड़े क्यों हैं? धर्म के नाम पर ज़रा-ज़रा सी बातों पर उन्हें क्यों भड़का लिया जाता है? कहीं लड़कियों के फ़ुटबाल खेलने के ख़िलाफ़ फ़तवा क्यों जारी हो जाता है? कोई क्रिसमस पर ईसाइयों को बधाई देने को क्यों 'इसलाम-विरोधी घोषित कर देता है? मुसलमानों को इन सवालों पर सोचना चाहिए और यह भी सोचना चाहिए कि उनके आसपास उनके बारे में लगातार नकारात्मक छवि क्यों बनती जा रही है? और क्या ऐसा होना ठीक है? मुसलमानों को अपने भीतर सुधारों और बदलावों के बारे में गम्भीरता से सोचना चाहिए.

नकवी यांचे हे चिंतन खरोखर मुस्लीम समाजाला विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. जनमानसात या समाजाबाबत असलेली नकारात्मक प्रतीमा बदलवण्यास सहाय्य करणारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर मुस्लीम विचारवंतानी गंभीरतेने विचार केल्यास इस्लामचा एक सकारात्मक चेहरा समाजासमोर येईल आणि तो सर्वांसाठीच सुदिन ठरेल.


- अनंत कोळमकर

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

पवारांची खंत महत्त्वाची

भाजपनेही विरोधी पक्षात असताना संसदेत कामकाज ठप्प पाडले होते. पण त्यांनी तशी चूक केली म्हणून आज तसे करणेे मूर्खपणाचेच आहे. काँग्रेसचा हा मूर्खपणा कठोरपणे थांबवण्याची गरज आहे. विनाकारण गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसला संसदेत एकटं पाडण्याची गरज आहे. तसे करण्याची धमक विरोधकांमध्ये केवळ पवार यांच्यातच आहे. त्यासाठी पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर विरोधी पक्षांना एकत्र केले पाहिजे. तरच काँग्रेसच्या हुकुमशाही मनोवृत्तीला व संसद ठप्प पाडणा-या गोंधळाला थांबवता येईल. अन्यथा काँग्रेसच्या पापात विरोधकही तितकेच सहभागी राहील.
माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्रात “जाणता राजा” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अमृतमहोत्सव दिल्लीत थाटात साजरा झाला. राज्यात अन्यत्रही त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आगामी काळात होतील. अनेकांचे  पवारांशी राजकीय मतभेद असू शकतात, पण त्यांच्या कर्तृत्वाबाबत कोणालाही संशय असू शकत नाही. एक प्रगल्भ, सोज्वळ, अभ्यासू आणि नव्या युवा नेत्यांसाठी त्यांची समाजमान्यता, लोकमान्यता प्रेरक अशीच आहे. त्यांच्यासारखा नेता लाखात एखादा असतो. त्यांना अमृतमहोत्सवानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा…
दिल्लीतील सत्कार कार्यक्रमात पवार यांनी जे मनोगत व्यक्त केले त्यात एक महत्त्वाचे विधान होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे हायकमांड सोनिया व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केले, हे विशेष आहे. खरं तर ती खंत होती. ते म्हणाले, “काहीही झाले तरी संसदेचे कामकाज चालले पाहिजे. लोकांनी तुम्हा-आम्हाला तेथे काम करण्यासाठी निवडून पाठवले आहे.” पवारांना प्रगल्भ नेते का म्हणतात, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या या विधानातून मिळते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व राष्ट्रहिताला प्राधान्य देणा-या नेत्यांच्या मनात सध्याची संसदेतील स्थिती पाहून कशी अस्वस्थता आहे, हे या विधानातून स्पष्ट होते.
आज नरेन्द्र मोदी सत्तेत आहे. मोदींच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष असतानाही, सर्व तथाकथित सेक्युलर, सोशलिस्ट मोदींच्या आगपाखड करीत असतानाही निवडून आले. आणि केवळ निवडून आले नाही, तर गेल्या दोन दशकातील खिचडी सरकारची संकल्पना मोडीत काढून बहुमताचे सरकार स्थापन केले. मोदींच्या या अभूतपूर्व व दणदणीत विजयाचे शिल्पकार मोदी तर आहेच, पण त्याहूनही महत्वाचे एक कारण आहे. गेल्या 60-70 वर्षात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचा या सत्ताकाळातील नाकर्तेपणाही मोदींच्या विजयाला तितकाच कारणीभूत आहे. ही कटू वास्तविकता समजून घेण्याची लायकी व कुवत सध्याच्या काँग्रेसश्रेष्ठींमध्ये नाही. कधीकाळी 400 च्या घरात खासदार निवडून आणणा-या काँग्रेसला गेल्या निवडणुकीत फक्त 40 खासदार निवडून आणता आले. इतका नीचांक गाठल्यानंतरही काँग्रेस झोपेतून उठण्यास तयार नाही, हे गेल्या काही दिवसात हा पक्ष ज्या पद्धतीने संसदेला वेठीस धरत आहे, त्यावरून दिसत आहे.
गेल्या आठवड्यात केवळ असहिष्णुता हा मुद्दा घेऊन काँग्रेसने संसद चालू दिली नाही. खरं तर या मुद्द्यात तसा दम नव्हता. पण केवळ मोदीला झोडपण्यासाठी अन्य विरोधकही काँग्रेसच्या खेळीत सहभागी झालेत. पण या आठवड्यात तर काँग्रेस स्व-स्वार्थासाठी संसदेत गोंधळ घालत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण न्यायालयात आहे. बरं ते प्रकरण भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर न्यायालयात दाखल झाले का? तसेही नाही. काँग्रेस सत्तेत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाने निर्णय दिला नाही. केवळ सोनिया व राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. न्यायालयाचे निर्देश हे सरकारचे सुडाचे राजकारण कसे होऊ शकते? न्यायालयात हजर राहणे गांधी कुटुंबाला अपमानास्पद वाटते काय? एवढ्याच मुद्द्यावर काँग्रेस खासदार संसदेत गोंधळ घालत आहे. तीन दिवस काम झाले नाही. पक्षश्रेष्ठींच्या मौन संमतीशिवाय असा गोंधळ घालण्याची हिंमत काँग्रेसचे खासदार जन्मात घालू शकत नाही.
हा गोंधळ घालून काँग्रेस केवळ संसदेला वेठीस धरत नाही, ती सा-या देशाला वेठीस धरत आहे. मात्र त्याहूनही अधिक महत्त्वाचे व गंभीर हे आहे की, काँग्रेस अन्य विरोधी पक्षांनाही गृहित धरत आहे. त्या गृहित धरण्याच्या काँग्रेसी मनोवृत्तीला शरद पवार यांच्या विधानाने शह दिला आहे. नाही म्हणायला भाजपनेही विरोधी पक्षात असताना संसदेत कामकाज ठप्प पाडले होते. पण त्यांनी तशी चूक केली म्हणून आज तसे करणेे मूर्खपणाचेच आहे. काँग्रेसचा हा मूर्खपणा कठोरपणे थांबवण्याची गरज आहे. विनाकारण गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसला संसदेत एकटं पाडण्याची गरज आहे. तसे करण्याची धमक विरोधकांमध्ये केवळ पवार यांच्यातच आहे. त्यासाठी पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर विरोधी पक्षांना एकत्र केले पाहिजे. तरच काँग्रेसच्या हुकुमशाही मनोवृत्तीला व संसद ठप्प पाडणा-या गोंधळाला थांबवता येईल. अन्यथा काँग्रेसच्या पापात विरोधकही तितकेच सहभागी राहतील.